सांगली : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता त्यावेळी राज्यातील वीज बिल वाढीव आल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली होती. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान, आता ‘हिंमत असेल तर ऊर्जा मंत्र्यांनी घरगुती वीज कनेक्शन तोडून दाखवावे, दोन हात करायला आम्हीही तयार आहोत’ असा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.
लॉकडाउनच्या काळात महावितरण कंपनीकडून भरमसाठ वाढीव वीज बिल दिले होते. परंतु, महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना तातडीने वीज बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन तोडण्यात येतील, असा इशारा दिला आहे.
महावितरणाच्या या भूमिकेवरून पार्श्वभूमीवर राजू शेट्टींनी त्याला प्रत्युत्तर दिली. कोरोना लॉकडाउनमधील विज बिल माफ करण्याची मागणी करत वीज कनेक्शन तोडू देणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे.
त्याचबरोबर ‘मंत्र्यांनी सुद्धा राज्यात दौरा करून सर्वसामान्यांची वीज बिलाबाबत असणारी परिस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केला आहे.