नवी दिल्ली – करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक पत्रकदेखील जारी केले आहे.
दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतीविषयक कायदा रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी हिवाळी अधिवेशन घेण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली होती.
या पत्राला उत्तर देताना प्रल्हाद जोशी यांनी यंदाचे हिवाळी अधिवेशन होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता थेट जानेवारीत सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू करू शकते. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अनुकूलता दर्शवली आहे.
“Various political party leaders expressed their concerns about the pandemic&opined of doing away with Winter Session.Appropriate to have Budget Session2021 in Jan,”says Union Parliamentary Affairs Min to Cong’s AR Chowdhury on his letter on convening winter session of Parliament pic.twitter.com/ufiLEN7Vzj
— ANI (@ANI) December 15, 2020