नाशिक – नाशिक शहरातील जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आंदोलन केले. केंद्र सरकारने केलेले तीन कृषीविषयक कायदे रद्द करावेत अशी मागणी या आंदोलकांनी केली.
या आंदोलनात शेतकरी समन्वय समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती, छावा आणि क्रांतीवीर शेतकरी संघटना आदी शेतकरी संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते. या संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्रित निदर्शने करण्यात आली. केंद्राने हे तीन शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द केले नाहींत तर उग्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी शेतकऱ्यांच्यावतीने देण्यात आला.
नवीन कायदे लागू झाले तर शेतकऱ्यांना उद्योगपतींचे बटिक होऊन राहावे लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान काल या जिल्ह्यात कॉंग्रेसच्यावतीनेही निदर्शने करण्यात आली.