शिर्डी -जगावर आलेले करोना महामारीचे संकट समूळ नष्ट होऊन सर्वांसाठीच पुन्हा गतवैभव व जनजीवन प्राप्त होऊ दे, अशी प्रार्थना राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज साईचरणी केली.
ग्रामविकासमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथील श्री साई मंदिरास भेट देवून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, राहात्याचे
तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थत होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत केलेल्या उपाययोजनांची पालकमंत्री मुश्रीफ यांनी पाहणी केली. तसेच करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या सर्व निर्देशांचे भाविकांनी दोखील काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.