नवी दिल्ली – उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील सुमारे 32 डॉक्टर अधिकृत माहिती न देता ड्युटीवरून बेपत्ता आहेत. त्यापैकी काही जण गेल्या वर्षभरापासून कामावर आलेले नाहीत. याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी आशुतोष दुबे यांनी सांगितले की, आरोग्य विभाग अशा डॉक्टरांना नोटीस पाठवलेली आहे. परंतु अद्याप या डॉक्टरांनी उत्तर दिलेले नाही. यासंदर्भातील अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.
नोंदीनुसार, जिल्ह्यात 21 सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि 51 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. जिल्ह्याचा आरोग्य विभाग आधीच डॉक्टरांच्या कमतरतेने त्रस्त आहे. याव्यतिरिक्त, 23 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 162 डॉक्टर केंद्रांवर नियुक्त आहेत, त्यापैकी 32 कोणत्याही अधिकृत सूचनेशिवाय बेपत्ता आहेत. यापैकी आठ जणांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बेपत्ता डॉक्टरांना अनेकवेळा नोटिसा पाठवण्यात आल्या असून यासंदर्भात शासनाला अहवालही पाठवण्यात आला आहे. डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी अडचण होत आहे. या बेपत्ता डॉक्टरांनी औपचारिकपणे राजीनामा सादर केलेला नाही किंवा त्यांच्या इतरत्र नियुक्तीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे सरकार आता त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करु शकते.