मुंबई – मुंबईतून आज उत्तरप्रदेश आणि बिहारचे 3100 मजुर श्रमिक स्पेशल ट्रेनने त्यांच्या राज्याकडे रवाना झाले. आज लखनौकडे जाणाऱ्या रेल्वेतून 1916 मजुर तिकडे रवाना करण्यात आले त्यांना साकीनाका पोलिसांनी प्रवासी परवानगी दिली.
तर दुपारी आणखी एक गाडी बिहारच्या नालंदाकडे रवाना करण्यात आली, त्यात मेघवाडी, जोगेश्वरी भागात राहणाऱ्या 1209 मजुरांना त्या ठिकाणच्या पोलिस ठाण्यांनी अनुमती दिल्यानंतर त्यांच्या गावी रवाना करण्यात आले. या मजुरांना बसेस मधून मध्यरेल्वेच्या कुर्ला स्थानकावर आणण्यात आले आणि त्यांची वैद्यकीय दृष्ट्या योग्य ती काळजी घेण्यात आली होती.