मुुंबई – मुसळधार पावसामुळे भाईंदरमध्ये इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अनेक दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ धाव घेत काही लोकांना बाहेर काढले आहे. अग्नीशमन दल, पोलिस पथक घटनास्थळी दाखरल असून, युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरु आहे. गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे जीर्ण इमारतींना सर्वाधिक धोका असतो. असे असतानाही धोकादायक इमारतीत नागरिक वास्तव्य करतात. यामुळे अशा दुर्घटना घडतात.
अशीच घटना भाईंदर पूर्वेला घडली आहे. स्टेशन समोर असलेल्या जुन्या इमारतीचा समोरील भाग सकाळच्या सुमारास कोसळला. या इमारतीत अनेक दुकाने आहेत. इमारतीखाली अनेक जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.