बिहार – बिहारमधील औरंगाबादमध्ये छटपूजेदरम्यान भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 2 महिलांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. हसनपूर बडगावमध्ये नदीच्या काठावर ही छटपूजा सुरू होती तेव्हाच ही घटना घडली.
Bihar: Two dead after a stampede broke out during #chhathpuja at a ghat in Aurangabad yesterday pic.twitter.com/EmDjkvhRrR
— ANI (@ANI) November 3, 2019
यावेळी अचानक घाटाजवळील मंदिराची भींत कोसळली. या अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. भींत कोसळल्यानंतर तिथे गोंधळ निर्माण झाला आणि पूजेसाठी जमलेले लोक इकडेतिकडे धावू लागले. त्यामुळे काही प्रमाणात चेंगराचेंगरी झाली.
Bihar: Two women dead after a temple’s wall collapsed near a ghat during Chhath puja in Samastipur, today. State Disaster Response Force (SDRF) rescue operation underway. pic.twitter.com/4G1xZAThmJ
— ANI (@ANI) November 3, 2019
दरम्यान, या घटनेतील जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या भिंत कोसळलेला भाग काढण्याच काम सुरू असून अन्य काही जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.