मुंबई – मुंबईतील आणिक गावात शुक्रवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या एका शाळेतील 16 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची माहिती महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.
शाळेत दुपारचे जेवण घेतल्यानंतर 16 विद्यार्थ्यांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना बालरोग वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे, असे चेंबूर येथील जनशताब्दी रुग्णालयाचे डीन सुनील फाकले यांनी सांगितले. मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे ते म्हणाले. त्यांच्यावर डॉक्टरांकडून सतत ठेवले जात आहे.
मध्यान्ह भोजन योजनेत सर्वच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. तथापि या विद्यार्थ्यांना नेमके कशा प्रकारचे अन्न दिले गेले होते याची माहिती उपलब्ध झालेली नाहीं. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.