चांडोली रुग्णालयासह वायसीएममधील चौघांची प्रकृती ठणठणीत
राजगुरूनगर – कडूस (ता. खेड) येथील दक्षणा फाउंडेशन मधील जेईई आणि नीट परीक्षेचा अभ्यास करणार्या 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली होती. चांडोली रुग्णालयातील सव पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुणालयात उपचारासाठी गेलेल्या 4 अशा सर्व विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक डॉ. पूनम चिखलीकर यांनी दिली.
या संस्थेतील 600 पैकी 170 विद्यार्थ्यांना शनिवारी (दि.20) अन्नातून विषबाधा झाली होती. 170 बाधीत विद्यार्थ्यांपैकी 4 पुण्याला व 59 विद्यार्थी राजगुरूनगर (चांडोली) ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत होते.
त्यांच्यावर अधीक्षक डॉ पूनम चिखलीकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे या उपचार करीत होत्या. तर उर्वरित विद्यार्थ्यांवर कडूस येथील दक्षणा फाउंडेशनमध्ये डॉ. अतुल भालेराव, डॉ. अवदुत डेरे, डॉ. ज्योती जाधव, डॉ. दीक्षा मोरे, डॉ विशाल डोळस यांनी उपचार केले. या सर्वांची प्रकृती आता ठणठणीत आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. पूनम चिखलीकर म्हणाल्या की, सर्व विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्यानंतर त्या अन्नाचे नमुने, विद्यार्थ्यांच्या उलटीचे नमुने घेण्यात आले होते ते मंगळवारी (दि. 23) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पुढील तीन ते चार दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त होईल.