नागपूर : राज्यामध्ये सुरु असलेल्या जलजीवन मिशन कार्यक्रमाला अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सुमारे 1 हजार 313 नवीन पदे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत निर्माण करण्यात येत असल्याची घोषणा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत केली.
#विधानसभा_प्रश्नोत्तरे
पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून पाणीपुरवठा विभागातील कामाला गती मिळावी यासाठी १३१३ जागा भरण्यात येतील. तसेच प्रत्येक तालुक्यातील एक उपअभियंता पद भरण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री @GulabraojiP यांनी सांगितले.— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 29, 2022
निवेदनात मंत्री पाटील म्हणाले, “यापूर्वी उप अभियंता संवर्गातील 207 पदांपैकी 182 पदांची व कनिष्ठ अभियंता संवर्गातील 1 हजार 172 पदांपैकी 1 हजार 94 पदांची वाढ करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये दोन-तीन तालुक्यांकरिता एक उप अभियंता कार्यालय होते.
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची चौकशी – उपमुख्यमंत्री फडणवीस
आता प्रत्येक तालुक्याला उप अभियंता कार्यालय देणार आहे. 173 ऐवजी 183 उप अभियंता कार्यालय होणार आहे. जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग अधिक मजबूत होणार असून जलजीवन मिशन कार्यक्रमाला गती मिळणार आहे”, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.