Gulabrao Patil – मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) सरकारची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दसरा मेळाव्यात जाहीर केली आहे. राज्याचा प्रमुख बोलत असतो, त्यावेळी त्यात तथ्य असते. मात्र या गोष्टीला सबुरीने आणि सल्ल्याने घ्यायला हवे.
सरकार हे कोणाचाही रोष न येता मार्ग काढून आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. त्यामुळे मराठा आरक्षण कार्यकर्त्यांनी थोड शांततेने घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मराठा कार्यकर्त्यांना केले आहे.
गेल्या दोन तीन दिवसांत राज्यभरात नेत्यांना गावबंदीसह तीव्र आंदोलन केले जात आहे. अनेक नेत्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न होत आहे. बसेसची तोडफोड केली जात आहे.
यावर गुलाबराव पाटील यांच्यासह मंत्री अनिल पाटील यांनी मराठा बांधवाना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. “सरकार आरक्षण देण्याच्या बाजूने आहे.
कोणालाही नाराज न करता टिकणारे आरक्षण पाहिजे असेल तर थोड संयमाने घ्यायला हवे,’ अशा प्रकारची भूमिका मंत्री अनिल पाटील यांनीही घेतली आहे.
गाव बंदी करण्याची मराठा कार्यकर्त्यांची भावना आहे. त्याचा आम्ही आदर करतो, मात्र मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवावा, असेही गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे.
केळी पीकविमाबाबत शेतकरी नाराज असले तरी राज्य सरकारने आपला वाटा भरला आहे.दिवाळीपर्यंत केळी पीक विमा रक्कम मिळेल असे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असेही यावेळी म्हटले आहे.