यवत- राज्यात गणेशोत्सव काळात गावात सलोख्याचे व शांततेचे वातावरण राहावे यासाठी आज (दि.3) दौंड तालुक्यातील यवत पोलिसांनी गावात आज सशस्त्र संचलन केले. या सशस्त्र संचलनात पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व त्यांचे पोलीस पथक सहभागी झाले होते.
यवत येथे हिंदू व मुस्लीम समाजासह आदी समाज मोठ्या संख्येने आहे. गणेशोत्सव व मोहरम हे दोन्ही उत्सव एकत्र येत असल्याने सण, उत्सव साजरे करताना जातीय सलोखा कायम राहील तसेच कोणत्याही समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन यावेळी यवत ठाण्याचे पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पाटील यांनी केले आहे.