संगमनेर – उपेक्षितांच्या उद्धारासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे व प्रत्येक भारतीयाला राज्यघटनेच्या माध्यमातून समतेचा अधिकार मिळवून देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेचे मानबिंदू असल्याचे गौरवोद्गार आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान व राष्ट्रीय दलित पॅंथर संगमनेर तालुका यांच्यावतीने आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी मा.आ डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, उत्कर्षा रूपवते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी.आर. कदम, कुसुम माघाडे, सुधाकरर रोहम, हिरालाल पगडाल, विश्वासराव मुर्तडक, किशोर टोकसे, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, अजय फटांगरे, शिवसेनेचे अमर कतारी, सीताराम राऊत, गौतम गायकवाड, प्रा. शशिकांत माघाडे, ऍड. अमित सोनवणे, दलित पॅंथरचे राजू खरात, प्रवीण गायकवाड, रवींद्र गिरी उपस्थित होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, उत्कर्षा रुपवते, श्रीकांत माघाडे, सुधाकर रोहम, बी.आर कदम यांचीही भाषणे झाली. यावेळी सुरेश थोरात, शिवाजी जगताप, ज्ञानेश्वर राक्षे, सुरेश झावरे, बाबा खरात उपस्थित होते.
विविध ठिकाणी जयंती साजरी
संगमनेर तालुक्यात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, यशोधन जनसंपर्क कार्यालय, जोर्वे, राजापूर, वडगाव पान यासह संगमनेर शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झालेल्या जयंती महोत्सवास आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी भेट देत महामानवास अभिवादन केले.