मुंबई – भारताकडे 15 खेळाडूंचा चांगला संघ असला तरी सध्या विश्वचषक स्पर्धेसाठी कोणीच प्रबळ दावेदार नाही. यंदा स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये बदल केला गेला असल्याने सर्वांना जिंकण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे, असे विधान दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर जॉंटी ऱ्होडस् याने केले आहे.
यंदाची विश्वचषक स्पर्धा राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये होणार असून, दहा संघ एकमेकांशी सामना करणार आहेत. या दहामधील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ संतुलित आहे; पण इतर संघदेखील कमी लेखुन चालनार नाही कारन अखेरीस ही विश्वचषक स्पर्धा आहे.