नवी दिल्ली – भारतीय संघ यंदा विश्वचषकातील संभाव्य विजेता संघ असुन यासाठी आम्ही आमचा सर्वात समतोल संघ उतरवला आहे असे विधान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले असुन अंतिम संघा मधील खेळाडूंच्या जागा अद्याप ठरलेल्या नाहीत हेही सांगायला ते विसरले नाहीत.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, इंग्लंड येथे ही स्पर्धा होत असुन संघात आम्ही सर्व प्रकारचे खेळाडू निवडले आहेत, जी की तेथील वातावरणाशी आणि खेळपट्टीशी जुळवुन घेऊ शकतील. त्यामुळे संघात कधी कोणता खेळाडू फलंदाजीला येइल हे आताच सांगणे कठीन आहे. कोण कधी खेळेल हे सामन्याच्या वेळीच ठरवले जाईल.
तसेच विश्वचषकासाठीच्या 15 जणांच्या संघात विजय शंकरच्या सहभागा बद्दल विचारले असता शास्त्री म्हणाले की, तामिळनाडूच्या संघाकडुन खेळताना विजय शंकरने आपल्यातील अष्टपैलूत्व दाखवुन दिले आहे. तो मोक्याच्या क्षणी बळी मिळवण्यात यशस्वी तर ठरतोच मात्र संघाला ज्या वेळी सर्वात जास्त गरज आहे त्या वेळी तो आपल्या खेळीने संघाला खराब स्थितीतून सुस्थितीमध्ये आणन्यात यशस्वी देखील ठरतो. त्यामुळे तो सध्या आमच्यासाठी चौथ्यास्थानासाठी उत्तम पर्याय असल्याचे आम्हाला वाटते त्यामुळे त्याची विश्वचषकासाठी निवड केली गेली आहे. मात्र, तरीही तोच चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल हे अद्याप निश्चीत नाही. कारण आमच्या संघातील सर्वच खेळाडू सर्वच स्थानांवर चमकदार कामगिरी करु शकतात, त्यामुळे सामन्यातील परिस्थिती पाहुन कोणता खेळाडू कधी खेळेल हे ठरवले जाईल असेही ते म्हणाले.
“वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ यंदा उत्तम कामगिरी करु शकतात, कारण वेस्ट इंडिजच्या संघात ख्रिस गेल आणि आंद्रे रसेल परतले आहेत तर ऑस्ट्रेलिया संघात वॉर्नर आण्इ स्मिथने पुनरागमन केले आहे. त्यांच्या व्यतिरीक्त इतर फलंदाज आणि गोलंदाज कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता बाळगतात त्यामुळे या संघांच्या कामगिरीकडे सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे.
-रवि शास्त्री, प्रशिक्षक भारतीय संघ
तसेच निवडलेल्य संघातील खेळाडूंमधील केदार जाधव हा सध्या जायबंदी असुन त्याच्या खेळण्यासंदर्भात अद्यापही प्रश्नचिन्ह असुन भारताचा मुख्य फिरकी गोलंदाज कुलदिप यादवहा फॉर्ममध्ये नसल्याची आठवन करुन दिली असता शास्त्री म्हणाले की, त्या बाबत मी आत्ता काहीच बोलु शकत नाही कारन त्यांच्या बाबत आवश्यक माहिती सध्या माझ्याकडे उपलब्ध नसून 22 मे रोजी जेंव्हा आम्ही विश्वचषकासाठी रवाना होवू त्यावेळी मला त्या बद्दल सर्व आवश्यक माहिती मिळालेली असेल. मात्र, सध्या तरी केदारच्या बाबतीत बोलायचे झाल्यास केदारला कोणत्याही प्रकारची मोठी जखम झालेली नसुन केदार हा संपुर्णपणे ठिक होण्याची चिन्हे आहेत. कारण त्याच्या खांद्याला फ्रॅक्चर झालेले नाही, त्यामुळे त्याचा खांदा निट व्हायला त्याला भरपुर वेळ मिळालेला आहे असेही त्यांनी नमूद केले.
तसेच ते पुढे म्हणाले की, विश्वचषकासाठी तुम्ही तात्काळ कोणता निर्णय घेऊ शकत नाहीत, तुम्हा अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धांमध्ये वेळे नुसार आणिस् थिती नुसार खेळी करत असता जी की तुमच्यासाठी आणि संघासाठी फायदेशीर ठरत असते. अशा वेळी तुम्ही केवळ समयसुचकता दाखवत सामन्यावर आपली पकड बसवु शकता ज्यामुळे की तुम्ही अशा स्पर्धांमध्ये आपले स्थान टिकवू शकता. कारण तुम्ही अशा प्रकारच्याअ मोठ्या स्पर्धांची तयारी ही आधिच्या विश्वचषकाच्या अखेरच्या सामन्यानंतर सुरू करता ही तयारी चार वर्ष चालते त्यामुळे तुम्ही अशा वेळी इन्स्टन्ट काही मिळवू शकत नाही असेही शास्त्रींनी यावेळी नमूद केले.