बर्मिंगहॅम – भारतीय संघाने बांगलादेशविरूध्दच्या सामन्यासाठी दोन बदल केले. भारतीय संघाने केदार जाधव आणि कुलदीप यादव यांच्याजागी भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिक यांना संघात स्थान दिले . तर दुखापतग्रस्त विजय शंकरच्या बदली ऋषभ पंतला संघात कायम ठेवले.
कालच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागल्यानंतर भारताने अपेक्षेनुसार फलंदाजी केली. फलंदाजी बळकट करण्यासाठी भारताने दिनेश कार्तिक याला केदार जाधवच्या जागी स्थान दिले होते,मात्र तो चांगली फलंदाजी करू शकला नाही. त्यामुळे एकाच वेळी धोनी, पंत व कार्तिक हे तीन यष्टीरक्षक भारताकडून खेळले. राहुल हा देखील स्थानिक सामन्यांमध्ये यष्टीरक्षण करतो.