पुणे – देशात भाजपला 300 जागा मिळतील आणि एनडीएला दोन तृतीयांश बहुमत मिळेल, असा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. जावडेकर यांनी मयुर कॉलनी इथल्या पी. जोग मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी त्यांनी भाजपच्या विजयाचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी प्रियंका गांधी तसेच राहुल गांधींवर टीका केली.
प्रियांका गांधी यांच्या वाराणसीमध्ये येण्याने काहीही फरक पडणार नाही, असे सांगत राहुल गांधी हे चौकीदार प्रकरणात खोटे बोलत असल्याचा आरोप जावडेकर यांनी केला आहे.