रांजणगाव गणपती-कारेगाव (ता. शिरूर) येथील प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ दोन वर्षांचा असताना शिरूर पंचायत समितीचे शिक्षणाधिकाऱ्यांनी अचानकपणे शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्याचा अजेंडा काढला आहे. त्याची कसलीही पूर्वसूचना न देता अचानक अजेंडा दिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. ाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी ग्रामपंचायतचे सरपंच अनिल ऊर्फ किसन नवले यांनी निवेदनाद्वारे शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ग्रामपंचायतीने शिक्षण मंत्रयांना दिलेल्या निवेदनानुसार शाळा व्यवस्थापन समितीमध्ये स्विकृत सदस्याची निवड करण्याची तरतूद नसतानाही संबंधित मुख्याध्यापकांनी सदस्यपदी काही पालकांची निवड केली. 2 ऑगस्टला अजेंडा काढून त्या सभेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व अध्यक्ष बदलीचा विषय घेण्यात आला. त्यानंतर 9 ऑगस्ट 2019 रोजी अजेंठा न काढता ठराविक वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक सभा आयोजित करून त्यामध्ये सदस्यांची निवड करण्यात आली. त्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतर व 10 ऑगस्ट रोजी अध्यक्ष निवडीचा अजेंडा काढून त्यामध्ये अध्यक्षांची निवड करण्यात आली. या सर्व प्रक्रियेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष सोन्याबापु नवले यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेण्यात आले नाही. प्रक्रिया पूर्णपणे चुकीची असून योग्य तो निर्णय घ्यावा व बेकायदेशीर रित्या स्थापन केलेली शाळा व्यवस्थापन समिती बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. तर मुख्याध्यापिका खामकर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.