मुंबई – राज्यात ऑनलाइन जुगारामुळे तरुण पिढी उध्वस्त होत आहे. मात्र राज्यातील गृहमंत्री काय करत आहेत? असा खडा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच सरकारला काही देणेघेणे नसून या जुगार अड्ड्यांकडून सरकारला हफ्ता येतो असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे.
राऊत पुढे म्हणाले की, राज्यात सातत्याने उघडपणे गोळीबाराच्या घटना घडत आहेत.आमदार गोळीबार करतात, हत्या, लुटमारीच्या घटना घडत आहेत. गुजरातमधून नाशिक, पुणे आणि मुंबईत हजारो कोटींचे ड्रग्ज येत आहेत. मात्र हे सरकार काय करतंय? गृहगमंत्री काय करतायेत?, असे सवालही त्यांनी विचारले.
माननीय गृहमंत्री महोदय
महाराष्ट्र राज्य
यांसी@Dev_Fadnavis @AmitShah @BJP4Maharashtra @mieknathshinde pic.twitter.com/8eaN16Xo6v— Sanjay Raut (@rautsanjay61) March 6, 2024
जुगार अड्ड्यांकडून सरकारला हफ्ता येतो. आता फडणवीस यांनी हे फेटाळले तर मी त्यांना पुरावे देईन, असेही राऊत स्पष्टपणे म्हणाले.