नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडला आहे. याचाच फटका उत्तर प्रदेशमध्येही करोनाबाधितांची संख्या चिंतेची बाब झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी गोरखपूरचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी करोनाला रोखण्यासाठी रुद्राभिषेकही केला. योगींनी गोरखनाथ मंदिरामध्ये करोनाची साथ आणि लोककल्याणाच्या संकल्पासाठी एक तास रुद्राभिषेक केला. ज्या पंडितांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांनी रुद्राभिषेक केला त्या पंडितांनी दिलेल्या माहितीनुसार या रुद्राभिषेकामुळे करोनाचे संकट दूर होण्यास मदत होणार आल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी या रुद्राभिषेकादरम्यान भगवान शंकराच्या वैदिक मंत्रांचे पठण केले. तसेच ११ लीटर दुध आणि पाच लीटर पाण्याने अभिषेक केला. मुख्यमंत्र्यांनी रुद्राभिषेकाचा सुरुवात गणपतीच्या पुजेने केली. रुद्राभिषेकासाठी मंदिराचे मुख्य पुजारी रमानुज त्रिपाठीसुद्धा उपस्थित होते. त्यांच्या पुढाकारानेच हा रुद्राभिषेक करण्यात आला. रामानुज यांनी मंत्रोच्चार केला तर इतर तीन पुजाऱ्यांनी त्यांना सहकार्य केले. रामानुज यांनी रुद्र या शब्दाचा अर्थच दु:खांचा नाश करणारे असा होतो, अशी माहिती दिली.
कोरोना को परास्त करने के संकल्प के क्रम में बचाव कार्य और वैक्सीनेशन के प्रति प्रदेश सरकार पूरी सक्रियता के साथ कार्य कर रही है।
आज जनपद गोरखपुर व अयोध्या में जारी बचाव कार्यों की समीक्षा की, ICCC का निरीक्षण किया और वैक्सीनेशन कार्य का अवलोकन किया।
हम जीतेंगे! pic.twitter.com/WLkA2goE2v
— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 10, 2021
करोनाच्या साथीच्या कालामध्ये प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी रुद्राभिषेक फायद्याचा ठरेल असे रामानुज म्हणाले. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री प्रत्यक्षात काम करण्यासोबतच आध्यात्मिक मार्गाचाही अवलंब करत असल्याचे रामानुज यांनी सांगितले. हा रुद्राभिषेकाचा विधी तासभर सुरु होता.
करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर योगी यांनी सोमवारी गोरखपूरचा दौरा केला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना संसर्ग झालेल्यांचं ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या मार्गाने काम सुरु आहे. या कामाचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे, अशी माहिती दिली. मागील १० दिवसांमध्ये राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या ८५ हजारांनी कमी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.