पुणे, दि. 20 -यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) ही संस्था तर्फे शाश्वत विकास ध्येय केंद्र म्हणून नावारुपाला आली आहे. राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या कार्याप्रती जाणीव जोपसली जावी, दैनंदिन कामकाजात त्यांच्याशी संबंधित विकास ध्येये व उद्दिष्टपूर्तीकरीता कार्यवाही व्हावी. लोकप्रतिनिधींमध्येही जाणीन जोपासली जावी यासाठी श्वाश्वत विकास ध्येय केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत प्रशिक्षण उपक्रम राबविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
राज्य प्रशिक्षण धोरणानुसार “यशदा’ या प्रशिक्षण संस्थेला शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करण्यात आले आहे. या संस्थेला राज्यातील इतर सर्व प्रशिक्षण संस्था संलग्न करण्यात आल्या आहेत. महसूल विभाग मुख्यालय स्तरावरील विभागीय प्रशासकीय संस्था व जिल्हास्तरावरील जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे संनियंत्रण “यशदा’ मार्फत करण्यात येत असते. जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी विविध विषयांवत सतत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येते. संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेली शाश्वत विकास ध्येये गाठण्यासाठी राज्यामध्ये प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांना जाणिवपूर्वक सहभाग आवश्यक आहे. शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याची गरज निर्माण झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी यांच्यामध्येही जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. विद्यापीठ स्तरावरील शिक्षण तज्ञ, संशोधक व विद्यार्थी यांचा सहभागही घेण्यात येणार आहे. या सर्वांना आवश्यक प्रशिक्षण कालबध्द पध्दतीने होण्यासाठी “यशदा’ने प्रस्ताव नियोजन विभागाला सादर केला होता.
केंद्र शासनाचा नियोजन विभाग व सांख्यिकी व काय्रक्रम कार्यान्वयन यांच्या “सांख्यिकी सक्षमीकरणासाठी सहाय्य ही केंद्र शासनाची योजना राबविण्याबाबत सामंजस्य करारही पूर्वी झालेला आहे. “यशदा’च्या प्रस्तावाचा विचार करुन शाश्वत विकास ध्येय -अंमलबजावणी व समन्वय केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तीन वर्षांत व्यापक प्रशिक्षण व्यवस्था व अनुषंगिक कार्य पूर्ण करण्यास व त्यासाठी येणाऱ्या 2 कोटी 65 लाखांच्या मान्यता देण्यात आली होती. आता नव्याने प्रशिक्षणाबाबत दोन वर्षासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा मार्ग मोकळा केला आहे.