दावडी, (वार्ताहर) – वाचनाशिवाय लेखन शक्य नाही. वाचन लेखकाला लिहिण्यासाठी समृद्ध करते, असे प्रतिपादन प्रतिपश्चंद्र आणि केदारनाथ या कादंबरीचे लेखक डॉ. प्रकाश कोयाडे यांनी केले. राजगुरूनगर येथे लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात डॉ. कोयाडे बोलत होते.
या कार्यक्रमाचे आयोजन मयुरी भवारी यांनी केले होते. याप्रसंगी अॅड. शुभम घाडगे, बाजार समितीचे माजी सभापती विनायक घुमटकर, बाळासाहेब सांडभोर, रजत जांभळे, दिलीप होले, डॉ. प्रमिला बांबळे ,डॉ. वंदना शेवाळे, अॅड. साधना बाजारे, डॉ. नीलम गायकवाड, मनीषा पवळे, डॉ. कुंतल जाधव,
लेखिका मीनाक्षी पाटोळे, अॅड. अक्षय पाटोळे, प्रा. वैभव ऐदाळे, चेतना कड, अंजली मोरडिव, मनोहर मोहरे, कल्पना जाधव, उषा लोहकरे, सुवर्णा विरणक, शामल सोनवणे, पायल चौधरी, अॅड. दिपाली वाळुंज, पुनम इंगळे, संगीता लोहकरे, रामेश्वरी कडलग आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. गणेश सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर डॉ. शितल खिसमतराव यांनी आभार मानले.