कोरेगाव (प्रतिनिधी) – मतदान जनजागृती करण्यासाठी कवितालेखन आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक यांनी दिली.
यावेळी तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, निवडणूक नायब तहसीलदार सारिका शिंदे ,मतदान जनजागृती विभागाचे समन्वय अधिकारी सुजितकुमार इंगवले, पथकप्रमुख यशेंद्र क्षीरसागर उपस्थित होते. विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत.
स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही. लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्त्व, मतदान आपले राष्ट्रीय कर्तव्य, चला मतदान करू देश घडवू! या तीन पैकी एका विषयावर आपली कविता लिहून पाठवावी. तसेच याच विषयांपैकी एका विषयावर 300 शब्दांमध्ये निबंध लिहून पाठवावा.
कवितेला शब्द संख्येचे बंधन नाही. निबंध आणि कविता स्पर्धा या शालेय विद्यार्थी गट, महाविद्यालयीन विद्यार्थी गट, खुला गट अशा तीन गटांमध्ये होईल. प्रत्येक गटातून तीन पारितोषिके दिली जातील.
निबंध तसेच कविता ,” सांख्यिकी विस्तार अधिकारी तथा जनजागृती पथक प्रमुख यशेन्द्र क्षीरसागर, ,पंचायत समिती कोरेगाव, ता. कोरेगाव या पत्त्यावर 25 एप्रिलपर्यंत पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.