मुंबई -अखेर आयसीसीने बीसीसीआय व ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ यांच्यासमोर माघार घेतली आहे. त्यामुळे आता येत्या 2 ते 11 जुन या कालावधीत इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होत असलेला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ड्युक्सच्या जागी कुकाबुरा चेंडूवर खेळवला जाणार आहे.
अर्थात या चेंडूमुळे कोणत्या संघाला लाभ होणार हे प्रत्यक्ष सामन्यात समजेलच परंतू ऑस्ट्रेलियाचा संघ सातत्याने याच चेंडूंवर कसोटी सामने खेळत असल्याने या सामन्यात त्यांची बाजी काहीशी वरचढ राहणार आहे. आता भारतीय फलंदाज कसे खेळतात यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे.
इंग्लंडमध्ये होणारे कसोटीसह सर्व दिर्घ दिवसांचे सामने ड्युक्स चेंडूंवरच खेळवले जातात. त्यामुळे याही सामन्यात याच चंडूंचा वापर होणार असेच जाहिर करण्यात आले होते. मात्र, त्यावर ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ व बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली होती.
अखेर आयसीसीने या दोन्ही मंडळांच्या मताला मान्यता देताना कुकाबुरा चेंडूवर शिक्कामोर्तब केले. हा सामना भारत व ऑस्ट्रेलियात होत असल्याने इंग्लंडमध्ये कोणते चेंडू वापरले जातात याला महत्व का दिले जात आहे, असेही प्रश्न या दोन्ही क्रिकेट मंडळांनी विचारले होते. या सामन्यासाठी 12 जुन हा राखिव दिवसही ठेवण्यात आला आहे.
भारतीय फलंदाज विरुद्ध ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज
कुकाबुरावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना भारतीय गोलंदाजांपेक्षा जास्त सराव आहे. ते कसोटी क्रिकेट याच चेंडूवर खेळतात त्यामुळे या सामन्यात भारताचे दीग्गज फलंदाज आणि ऑस्ट्रेलियाचे कसलेले वेगवान गोलंदाज असाच हा सामना रंगणार आहे.