पॉंडिचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांचा सल्ला
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे यूपीएससी गुणवंतांचा गौरव
पुणे – देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी समर्पण भावनेने कार्य कसे करावे, हा विचार केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांनी करावा, असा सल्ला पॉंडिचेरीच्या नायब राज्यपाल डॉ. किरण बेदी यांनी दिला.
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), पुणेतर्फे यूपीएससी स्पर्धा परीक्षा-2019 मधील यशस्वितांच्या 12 व्या राष्ट्रीय स्तरावरील सत्कार आणि प्रोत्साहन सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी माजी परराष्ट्र सचिव श्याम सरेन, माजी मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा व माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा हे उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, कुलगुरू डॉ. एन.टी.राव, प्रा. रविंद्रनाथ पाटील आणि प्रा.डॉ.शैलश्री हरिदास हे उपस्थित होते. या प्रसंगी “यूपीएससी’ परीक्षेमध्ये भारतात तिसरी आलेली प्रतिमा वर्मा हिचा सत्कार केला व तिला 21 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
डॉ. बेदी म्हणाल्या, सेवा करतांना सर्वात प्रथम स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊन फीट रहावे. या क्षेत्रात रोज शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी असल्यामुळे सदैव शिकत राहून त्यातील कौशल्य गुण आतमसात करावे.