पुणे – फेसबुकवरील मैत्रीणीने फेसबुक कॉल करुन एका संगणक अभियंत्याला लॉजवर बोलावून घेतले. यामुळे सुखावलेला हा व्यक्ती कोणताही मागचा पुढचा विचार न करता थेट लॉजवर पोहोचला. मात्र तेथे गेल्यावर मैत्रीणीऐवजी दोन भामट्यांच्या ट्रॅपमध्ये तो सापडला. त्यांनी त्याला सायबर पोलीस असल्याचे सांगत, धमकावून 53 हजाराची रोकड एटीएममधून काढून घेतली. यामुळे पोलिसांनी आवाहन केले आहे की अशा प्रकारे कोणत्या फेसबुक फ्रेंडने बोलवले तर जाण्याअगोदर शंभर वेळा विचार करा.
याप्रकरणी राजस ज्ञानेश्वर कोल्हे( 46,रा.रावेत, पिंपरी चिंचवड) यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानूसार फेसबुक फ्रेंड मनीषा जी आणि दोन अज्ञात व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसोर राजस यांनी मनीषा जी नावाच्या महिलेने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यांनी ती स्विकाल्यावर त्यांच्यात संवाद होत होता. दरम्यान मनीषाने बुधवारी राजसला फेसबुक कॉल करुन वारजे येथील हॉटेल स्वर्णा येथे बोलावून घेतले.
ते साडेपाचच्या सुमारास तेथे गेले असता तेथे मनीषा ऐवजी दोन पुरुष भेटले. त्यांनी राजस यांना बाजूला घेत “आम्ही सायबर पोलीस असून, तु मुलींना ट्रॅप करतो, तु त्यांचे व्हिडिओ काढतो, आम्हाला चेक करायचे आहे, असे म्हणत लॉजच्या बाहेर आणले. तेथे चौकीला चल अशी धमकी देऊन दम भरला. यानंतर तडजोड करण्याच्या बहाण्याने जवळील एटीएममधून 53 हजार 500 रुपये काढून घेतले.
यानंतर घाबरलेल्या संगणक अभियंत्याला दोघांचाही संशय आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर यांनी सांगितले, फिर्यादी संगणक अभियंता असून त्याची दोन तीन दिसवसांपुर्वीच फेसबुकवर मनीषा जी नावाच्या महिले मनीषा जी नावाच्या महिलेशी ओळख झाली होती. याप्रकरणी तातडीने तपास करत आम्ही तीघांना ताब्यात घेतले आहे. महिलेच्या नावाने आरोपीच फेसबुक खाते चालवत असल्याचा आम्हाला संशय आहे.