भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मर्यादित 20 षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज गयाना इथल्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होणार आहे.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (Toss) हा भारताच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (India have won the toss and elect to bat first in the 2nd T20I against West Indies) दुसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त कुलदीप यादव याच्या जागी रवि बिश्नोई याला स्थान देण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा यजमान संघानं पराभव केला होता. आता दुसरा सामना जिंकून पाच सामन्याच्या मालिकेत 1-1 बरोबरी करण्याचा प्रयत्न हार्दिक पांड्या आणि टीमचा असेल.