त्रिनिदाद :- कसोटी व एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिज विरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज बनला आहे. यजमान वेस्ट इंडिजचा संघ घरच्या मैदानावर खेळत असला तरीही या मालिकेतही भारतीय संघाचीच बाजू वरचढ राहणार आहे.
रोहित शर्मा, विराट कोहलीसह अन्य काही वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून संघातील नवोदितांना आपली छाप पाडण्याची नामी संधी मिळाली आहे.
पहिल्या T20 सामन्यास थोङ्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (Toss) कौल हा वेस्ट इंडिजच्या बाजूनं लागला आहे.वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान,यापूर्वी टीम इंडियाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला होता.