मुंबई – देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजपचे सरकार आल्यानंतर वारंवार चर्चेत येणार कायदा म्हणजे समान नागरी कायदा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्यावर भाष्य केलं आहे. निमित्त होते एका मीडिया हाऊसच्या कार्यक्रमाचे. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे देखील उपस्थित होते.
नाना पाटेकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवर विविध प्रश्नाची सरबत्ती केली. समान नागरी कायद्याबाबत नानांनी फडणवीसांना प्रश्न विचारला असता,फडणवीस म्हणाले,”समान नागरी कायदा आपल्या संविधानाने डायरेक्टीव्ह प्रिन्सीपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये सगळ्या राज्यांवर जबाबदारीच टाकली आहे. संविधानानेच सगळ्या राज्यांवर ही जबाबदारी टाकली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री इथे आहेत, गोवा एकमेव राज्य आहे जिथे समान नागरी कायदा अस्तित्वात आहे. आता, उत्तराखंडमध्येही येतोय.
नेमकं काय म्हणाले फडणवीस यावेळी
काही लोकं समान नागरी कायदा म्हटल्यावर त्याचे चुकीचे अर्थ लोकांमध्ये जाऊन सांगतात.
आता, समान नागरी कायदा आला म्हणजे तुमचं आरक्षण जाणार आहे, मग शेड्युल कास्टला आरक्षण मिळणार नाही.. वगैरे..
पण, काही संबंध नाही. समान नागरी कायद्याचा अर्थ एवढाच आहे की, आमचे जन्माचे कायदे वेगळे आहेत, लग्नाचे कायदे वेगळे आहेत, सबकेशनचे कायदे वेगळे आहेत. सगळ्या प्रकारचे वेगवेगळे कायदे आहेत.
एक देश, एक समाज, एक कायदा..अशाप्रकारे हा समान नागरी कायदा डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना अपेक्षित होता.
म्हणूनच त्यांनी संविधाना लिहंलय की, राज्य हा प्रयत्न करेल की समान नागरी कायदा आला पाहिजे. अजून आपण आणू शकलो नाहीत. पण, येईल, असेही फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं.