लखनौ – लॉकडाउनच्या काळात सर्वसमान्यांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते मागे घेण्याचा निर्णय उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने घेतला आहे. यापूर्वी केवळ व्यापाऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात आले होते. राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाखो नागरिकांना फायदा होणार आहे.
गुन्हे दाखल झाल्यामुळे पोलीस ठाणे आणि न्यायालयांच्या फेऱ्या माराव्या लागणाऱ्या तब्बल अडीच लाख जणांना यातून दिलसा मिळणार आहे. यापूर्वी सरकारने ज्या व्यापाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार व्यापाऱ्यांची माहिती गोळा करण्यात पोलीस खाते गुंतले असतानाच आता हा आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.