नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती पक्षातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या ‘जनआशीर्वाद यात्रे’चे निमंत्रण न मिळाल्याने नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याविषयी बोलताना त्यांनी “आपल्याला अजून पक्षाकडून ‘जनआशीर्वाद यात्रे’चे निमंत्रण मिळालेले नाही. आता निमंत्रण मिळाले तरी यात्रेत सहभागी होणार नाही असे म्हणत जाहीररित्या आपली नाराजी व्यक्त केली.
वास्तविक, मध्यप्रदेशात भाजप सरकारच्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाकडून ‘जनसंपर्क यात्रा’ काढण्यात येत आहे. या यात्रेसाठी अनेक नेतेमंडळी हजेरी लावणार आहेत. परंतु, राज्याच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना या यात्रेचे अजूनपर्यंत निमंत्रणही देण्यात आलेले नाही.त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्याविषयी भोपाळमध्ये एका कार्यक्रमाला आलेल्या उमा भारती यांना याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
याविषयी बोलतां त्यांनी, “यात्रेदरम्यान मला कुठेही निमंत्रित करण्यात आले नाही. मला काही फरक पडत नाही, हो, पण माझ्या मनात एक विचार नक्की येतो की, जर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांचे सरकार बनवले असेल तर तर मीही सरकार एक बनवले आहे. 2020 च्या पोटनिवडणुकीत मला कोरोनाची लागण झाली होती. फक्त 11 दिवस झाले होते. पक्षश्रेष्ठींच्या आवाहनावरून मी निवडणूक प्रचारात उतरले. भाजपचा विजय नक्कीच होता आणि माझ्यामुळे एका जागेने नक्कीच यात भर पडली आहे.
यात्रेविषयी पुढे बोलताना त्यांनी,”मला यात्रेला जायचे नव्हते, कारण या लोकांना भीती वाटते की मी तिथे पोहोचले तर लोकांचे सर्व लक्ष माझ्याकडे जाईल.मला जायचे देखील नाही, किमान त्यांनी निमंत्रणाची औपचारिकता तरी पूर्ण करायला हवी होती.उमा भारतीने ट्विट करत आपल्या सर्व भावना त्यांनी बोलून दाखवल्या आहेत. त्यात त्यांनी,”शिवराजजींबद्दल माझ्या मनात असलेला आदर आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दलच्या आपुलकीचा धागा अतूट आणि मजबूत आहे. शिवराज जेव्हा कुठेही मला प्रचार करायला सांगतील तेव्हा त्यांचा आदर राखून मी प्रचार करू शकते. मी अशा लोकांपैकी पक्षाचे कधीही नुकसान करणार नाही.