मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार यांची उपस्थिती होती. शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच स्टेजवर उपस्थित असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरून पवारांवर राजकीय नेत्यांकडून अत्यंत बोचरी टीका करण्यात आली आहे. शरद पवार यांनी नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नय़े, असा महाविकास आघाडीचा सूर होता. पण शरद पवार पुरस्कार समितीमध्ये असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
यावर आता माध्यमांशी जितेंद्र आव्हाड म्हणाले,’मला वाटतं की मी शरद पवारांना फार ओळखत नाही. पण शरद पवार यांच्या व्यक्तिमत्तवाचे काही खास पैलू आहेत. ते वैचारिक विरोध कायमच करत राहतील. पण वैयक्तिक द्वेष कधीच करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ते ज्या कार्यक्रमात दिसले तेव्हा ते माझ्या अंदाजाप्रमाणे ठरवून गेले होते की आपल्याला काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या लोकमान्य टिळकांविषयी बोलायचं आहे. तेच त्यांच्या भाषणातही दिसल’ असं म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिले.