Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार असून त्या दिवशी घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात येईल असा दावा संजय झा यांनी केला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बिहारच्या प्रचार दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे. निवडणूक आता संपुष्टात आली आहे. राहुल गांधी यांच्या येण्याने आता काय होणार आहे? यावरूनच समजते की बिहारबद्दल त्यांची काय भावना आहे अशी टिप्पणीही झा यांनी केली आहे.
जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात कॉंग्रेस नेते शकिल अहमद यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या संदर्भात बोलताना संजय झा म्हणाले मुंबईत विरोधी पक्षांची बैठक झाली त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ममता बॅनर्जी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना सांगत होते की निवडणुकीचा अजेंडा ठरवावा. त्या अजेंड्यानुसार देशभर प्रचार करावा. जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित करावा.
त्यावेळी या मंडळींनी ऐकले नाही. आज मात्र त्याविषयीच बोलताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्या बैठकीला हे लोक उपस्थितही नव्हते. आम्ही सगळ्यांनी सांगितले. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनीही सांगितले की हा विषय अजेंड्यावर घ्यावा आणि त्यावर बोलावे. तेंव्हा कॉंग्रेसनेच त्याचा पूर्ण विरोध केला.
कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टीचे सरकार यावे यासाठी पाकिस्तानात प्रार्थना केली जाते आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाबाबत विचारल्यावर संजय झा म्हणाले की निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आपण आलो आहोत. ४ तारखेला या घराणेशाहीचा अंत होणार आहे.
दहा लाख लोकांना रोजगार दिल्याचे तेजस्वी यादव म्हणतात तर मग १५ वर्ष त्यांचे सरकार होते तेंव्हा कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या ते देत होते? नोकऱ्या देणाऱ्या सर्व उद्योगपतींना यांनीच पळवून लावले. सगळे साखर कारखाने बंद पाडले. एवढेच काय डॉक्टर लोकाही बिहारमधून पळून गेले, कोणीच राहीले नाही.
राज्यात २००६ नंतर संधी वाढल्या आणि लोकांना रोजगार मिळण्यास सुरूवात झाली. मुख्यमंत्र्यांना डावलून सरकारमध्ये एक कागदही इकडून तिकडे जाऊ शकत नाही. ज्या काही नोकऱ्या मिळाल्याचा दावा तेजस्वी करत आहेत त्या नितीश यांनीच दिल्या आहेत.