चार विधानसभांसाठी भाजपच्या इच्छुकांना मुलाखतीत विचारला प्रश्न
आळंदी – खेड-आळंदी, शिरूर-हवेली, आंबेगाव, जुन्नर या चार विधानसभासाठी जवळपास 31 उमेदवार भाजपतर्फे इच्छुक आहेत. या इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी (दि. 26) आळंदीत घेण्यात आल्या. राज्यमंत्री आणि पक्षाचे शहर प्रभारी रवींद्र चव्हाण यांनी एकापाठोपाठ या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी तुम्हाला उमेदवारी का द्यावी? असा प्रश्न विचारण्यात आला.
आळंदी येथील शासकीय विश्रामगृहात मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, राज्य संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हा सरचिटणीस पांडुरंग ठाकूर, अविनाश बबरे, सचिन सदावर्ते, संजय घुंडरे, खेड तालुका प्रभारी सुशील सैंदाणे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, आळंदी शहराध्यक्ष भागवत आवटे, गटनेते पांडुरंग वहिले, अमर बोऱ्हाडे, एकनाथ मोरे, बंडूनाना काळे, संतोष गावडे आदी उपस्थित होते. तुम्हाला उमेदवारी का द्यावी व आमदार झाल्यावर काय करणार? असे प्रश्न सर्वच इच्छुकांना विचारण्यात आले. तसेच उमेदवारी दिली नाही, तर काय करणार? असा प्रश्नही इच्छुकांना विचारला गेला.
विधानसभानिहाय इच्छुक :
खेड-आळंदी : अतुल देशमुख, संदीप सोमवंशी, राजन परदेशी, रामदास मेदनकर, पांडुरंग शितोळे, राहुल चिताळकर, दिलीप मेदगे
शिरूर-हवेली : आमदार बाबुराव पाचर्णे, दादासाहेब सातव, रोहिदास उंद्रे, भगवान शेळके, गणेश कुटे, सुनील कांचन, पूनम चौधरी
आंबेगाव-शिरूर : संजय थोरात, डॉ. ताराचंद कराळे, जयसिंग एरंडे, अनिल नवले, सतीश पाचंगे, भानुदास काळे, ऍड. सुरेश पलांडे, गणेश ताठे, विजय पवार
जुन्नर : भगवान घोलप, मधुकर काजळे, काशिनाथ आवटे, उल्हास नवले, अमोल शिंदे, रोहिदास भोंडवे, अरुण कबाडी, जयदास साळवे, वैशाली हांडे, स्वाती घोलप.