नवी दिल्ली – काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये आहे. राजस्थानमध्ये देखील राहुल गांधींच्या या यात्रेला सर्वसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. यावेळी राहुल गांधींनी काही स्थानिक संदर्भ देत सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी प्रेरणादायी काम केलं परंतु प्रत्येक सभेत केवळ तेच न सांगता आपण जनतेसाठी काय करणार आहोत हे देखील सांगा असे आवाहन राहुल गांधींनी पक्षातील कार्यकत्यांना केले.
‘जय सियाराम’ आणि जय श्री राम यावरून देखील राहुल गांधींनी भाजपसह आर एस एसवर टीका केली. ‘जय सियाराम’ म्हणण्याची राजस्थानची संस्कृती आहे. तुम्ही जय सियाराम का म्हणत नाहीत ? असा सवाल राहुल गांधींनी यावेळी आर एस एसला विचारला. ते सीतामाईचा अपमान का करतात ? त्यांना माझं आवाहन आहे की त्यांनी जय सियाराम म्हणावं. त्यांच्या संघटनेत एकही महिला नाही ते महिलांना अपमानित करतात ते जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्ही याबाबत त्यांना प्रश्न विचारा असही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
View this post on Instagram
एका काँग्रेस नेत्याने राहून गांधींची तुलना थेट महात्मा गांधींशी केली होती/ यावर देखील राहुल गांधींनी भाष्य केले. गांधींची आणि माझी तुलना कधीही होऊ शकत नाही. गांधीजींनी देशासाठी आयुष्य वाहिली,अनेक वर्ष तुरुंगात घालवली त्यांनी जे देशासाठी केलं त्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे आमच्या दोघांची तुलना कोणीही करू नये असं राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केलं.