प्रत्येकजण मंदिरात प्रार्थना करण्यासाठी जातो. मंदिरांच्या दारावर घंटा बांधल्याचं तुम्ही पाहिलं असेल. सहसा लोक मंदिरात जाण्यापूर्वी घंटा वाजवतात. त्यानंतरच देवाची पूजा आणि दर्शन करतात. हिंदू धर्मात मंदिराबाहेर घंटा बांधण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे, पण मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी घंटा का वाजवली जाते हे तुम्हाला माहीत आहे का? यामागचे कारण वैज्ञानिक आणि अतिशय खास आहे.
मंदिरात सकाळ-संध्याकाळ पूजा आणि आरती होते तेव्हा लहान-मोठ्या घंटा एका विशिष्ट तालात आणि सुरात वाजवल्या जातात. असे मानले जाते की घंटा वाजवल्याने मंदिरात स्थापित केलेल्या देवतांच्या मूर्तींमध्ये चैतन्य जागृत होते. यानंतर त्याची उपासना आणि पूजा अधिक फलदायी आणि प्रभावी होते. चला तर जाणून घेऊया, मंदिरात घंटा वाजवण्यामागील शास्त्रीय कारण काय आहे?
मंदिरात घंटा वाजवल्याने मानवाच्या अनेक जन्मांची पापे नष्ट होतात असे पुराणात सांगितले आहे. सृष्टीची सुरुवात झाल्यावर जो नाद (ध्वनी) प्रतिध्वनी झाला, तोच नाद घंटा वाजल्यावर येतो, असे म्हणतात. घंटा हे त्याच आवाजाचे प्रतीक मानले जाते.
मंदिरांच्या बाहेरील घंटा हे काळाचे प्रतीक असल्याचे मानले जाते. असेही मानले जाते की जेव्हा पृथ्वीवर सर्वनाश होईल, त्या वेळी वातावरणात घंटा वाजवल्यासारखा आवाजही ऐकू येईल. मंदिरात घंटा बसवण्यामागे केवळ धार्मिकच नाही, तर वैज्ञानिक कारणेही आहेत.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा घंटा वाजते तेव्हा वातावरणात एक कंपन निर्माण होते आणि ते वायुमंडळाच्या कारणामुळे खूप दूर जाते. या कंपनाचा फायदा असा आहे की त्याच्या कक्षेत येणारे सर्व जीवाणू, विषाणू आणि सूक्ष्मजीव इ. नष्ट होतात. यामुळे मंदिर आणि आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते.
असे म्हणतात की ज्या ठिकाणी घंटानाद नियमितपणे होतो, त्या ठिकाणचे वातावरण नेहमी शुद्ध आणि पवित्र राहते. असेही मानले जाते की घंटा वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. यामुळे लोकांसाठी समृद्धीची दारे खुली होतात.