जातीच्या भिंती मजबूत होत आहेत का? समाजातील जातीवाद कधी बंद होणार? माणूस म्हणून आपण एकमेकांना कधी स्वीकारणार? हे प्रश्न मला सतावत आहेत. काल परवाचीच गोष्ट. पुण्यात एका युवकाची हत्या करण्यात आली. का तर त्याने वेगळ्या जातीतील मुलीवर प्रेम केल म्हणून. आपण माणूस आहोत. हीच एकमेव जात आहे, हे कधी स्वीकारणार? समाजात विविध जातींच्या संघटना आहेत.
आरक्षण, मेळावे याद्वारे जाती उद्धाराचे त्यांचे कार्यक्रम समजण्यासारखे आहेत. जाती उद्धाराच्या टप्प्यांमध्ये या संघटनांच्या नेतृत्वाने व यंत्रणेने हितसंबंध तयार होतात. एकगठ्ठा मतांची बॅंक तयार होते. त्यामुळे जाती उद्धारानंतर जातिअंताच्या टप्प्याकडे संघटना वळताना दिसत नाहीत. शेवटी त्याच संघटना जाती जातीचे वधू वर मेळावे बोलावून जातीच्या भिंती मजबूत करताना दिसतात. त्यामुळे फुले -शाहू -आंबेडकर, हे केवळ मेळाव्यांतील फोटोमध्येच कैद होतात. जातीअंताची मोहीम चळवळ बनली पाहिजे. जाती उद्धारात अडकलेल्यांनी जातिअंताकडे वळावे. नाहीतर उद्याचा भारत हा अशाच हजारो पोटजातीमध्ये दुभंगलेला दिसेल.
अमोल अंबादास मांडे
मढेवडगाव, ता.श्रीगोंदा संपर्क : 8975251296