मुंबई – ‘लार्जर दॅन लाइफ’ सेट, दमदार कलाकार, उत्कृष्ट कथानक व दिग्दर्शन यांच्या जोरावर “बाहुबली’च्या (Baahubali) दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमविला होता. ‘बाहुबली : द बिगनिंग’ हा चित्रपट एका अशा निर्णायक वळणावर येऊन संपला होता की, संपूर्ण जगाला ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दुसऱ्या भागाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जो विक्रम रचलाय, तो अद्याप कोणत्याही चित्रपटाला मोडता आला नाही.
बाहुबली (Baahubali) चित्रपटातील सर्वच पात्र आज सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. चित्रपटातील कट्ट्पा, देवसेना, कालकेय, भल्लाळ देव,बाहुबली (Baahubali) या सर्व व्यक्तिरेखांना एकाच माळेत ओवण्याचे काम दिग्दर्शकाला करावे लागले. तसेच या माळेतील एकही मोती हरवणार नाही याकडे त्यांना लक्ष ठेवावे लागते.
बाहुबली (Baahubali) सारख्या भव्यदिव चित्रपटात जीव आणण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजेच, एस.एस राजमौली (ss rajamouli) यांचा खुप मोलाचा वाटा आहे. दिग्दर्शनावर चित्रपटाचे भविष्य टिकुन असते. अनेक दिग्दर्शक त्यांच्या उत्तम कामासाठी खुप जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाने चित्रपटत खऱ्या अर्थाने जिवंत होतो.
एस एस राजमौली (ss rajamouli) यांनी आजपर्यंत अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. पण त्यांना ‘बाहुबली’ चित्रपटाने वेगळी ओळख निर्माण करून दिली. या चित्रपटाने तिकीट बारीवर जोरदार धुमाकूळ घालत बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्डस् मोडीत काढले.
या चित्रपटाने जगभरात एकूण 1810 कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान, आता असे बोलले जाते की, राजमौली (ss rajamouli) यांनी बाहुबली (Baahubali) चित्रपटाच्या एकूण कमाईपैकी पन्नास टक्के कमाई मानधन म्हणून घेतली होती. त्यानुसार ते सर्वात महागडे दिग्दर्शक आहेत.