मुंबई : शिर्डी वादावर भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच्या झालेल्या चर्चेनंतर ग्रामस्थ समाधानी असल्याचे विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिर्डी वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर ग्रामस्थांशी चर्चा केली. यावर विखे पाटील यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाटील म्हणाले की, शिर्डी वादासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा समाधानकारक होती. आमचा कोणत्याही तिर्थक्षेत्राच्या विकासाला विरोध नाही. शिर्डी वादासंदर्भात ग्रामस्थ समाधानी असून शिर्डी बंद आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणाही विखे पाटील यांनी केली.
नेमकं काय आहे प्रकरण
परभणी जिल्यातील पाथरीचे साई जन्मस्थळ म्हणून विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. या घोषणेनंतर शिर्डीत बंद पाळण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख मागे घ्यावा तरच शिर्डीचे आंदोलन थांबेल. असा इशारा शिर्डी ग्रामस्थानी दिला होता. त्यावरून नव्या वादाला राज्यात तोंड फुटले होते. त्यावर आता ग्रामस्थ समाधानी असल्याची प्रतिक्रिया विखे पाटील यांनी दिली आहे.