मुंबई: जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठातील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत झालेल्या निदर्शनात ‘फ्री काश्मीर’चे फलक झळकावणाऱ्या सरकार मुलीला पाठीशी घालत असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी मुंबईत प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
विद्यापीठातील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत गेट वे ऑफ इंडियावर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. त्यावेळी मेहक प्रभू या विद्यार्थिनीने ‘फ्री काश्मीर’चा फलक झळकावले होते. भाजपने या तरुणीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याच मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला घेरले आहे. सरकाने पोलिसांवर दबाव टाकला असून सरकार पुरावे मिटवत असल्याचा आरोप शेलार यांनी केला.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. आपण संपादक आहात याचा विसर पडला असेल तर आम्ही तुम्हाला रामभाऊ म्हळगी प्रबोधनी प्रबोधणींमध्ये विशेष ट्रेनींग देऊ असा टोला शेलार यांनी लगावला. सामना वृत्तपत्रातून पोस्टर झळकावणाऱ्या तरुणीची बाजू मांडण्यात आली होती. त्यावर आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे.