नवी दिल्ली – गेल्या महिन्याभरापासून आरोप-प्रत्यारोपामुळे गाजलेल्या पाचही राज्यांचा निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी आहे. त्यामुळे आज कोण विजयी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Too early to say anything because there are so many rounds. Situation will be clear only by evening. We had started from 3 & were challenged that we won’t get even 100, we have crossed that mark. We will cross the magic number too: Kailash Vijayvargiya, BJP#WestBengalPolls pic.twitter.com/ZS5LmrGcNF
— ANI (@ANI) May 2, 2021
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाने आतापर्यंत १२० जागांचे कल जाहीर केले आहेत. यामध्ये १२० पैकी तृणमूल काँग्रेस ७५ तर भाजपा ४३ जागांवर आघाडीवर आहे. मात्र भाजप नेते कैलास विजयवर्गीय पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीत भाजपचं विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
कैलास विजयवर्गीय म्हणाले,’अनेक फेऱ्या असल्याने सध्या काहीही बोलणं घाईचं ठरेल. आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. ते पुढे म्हणाले, आम्ही तीनपासून सुरुवात केली होती. १०० जागाही मिळणार नाहीत असा दावा करण्यात आला होता, पण आम्ही तो ओलांडला आहे. आम्ही बहुमताचा आकडाही पार करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.