कामशेत – केंद्राच्या अर्थसंकल्पातून सामान्य शेतकऱ्याला आधार मिळेल यासाठी सोळा कलमी कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी मांडण्यात आला आहे. आणि महाराष्ट्रात एक कलमी कार्यक्रम चालविला जातो आहे. महाराष्ट्रातील कर्जमाफीचा शासन निर्णय (जीआर) पहा कर्जमाफीच्या “जीआर’मध्ये अंमलबजावणीच्या वेळेची निश्चिती नाही फक्त कर्जमाफी करणार असे म्हणणारे राज्य सरकार पाच वर्ष टीकणार नाही आणि आम्ही टिकून देणार नाही, जोपर्यंत महाराष्ट्राच्या सातबाऱ्यातून शिवसेना मुक्त होत नाही, तोपर्यंत शेतकरी कर्जमुक्त होणार नाही, असे वक्तव्य कामशेत येथे आमदार नितेश राणे यांनी केले.
पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेचे कामशेत येथे नूतन शाखेचे उद्घाटन कणकवलीचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
या वेळी पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, माजी आमदार दिगंबर भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, तळेगाव नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, सभापती सुवर्णा कुंभार, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, सहायक निबंधक अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी, पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय नाटक, कामशेत सरपंच रुपाली शिनगारे आदी मान्यवरांसह ठेवीदार, सभासद व मावळ तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.