नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात असून निवडणूक प्रचारात नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक दिसून येत आहे. तर दुसरीकडे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या आणि एनआरसीच्या विरोधात गेल्या ५० हून अधिक दिवसांपासून दिल्लीतल्या शाहिन बागेत आंदोलन सुरू आहे. शाहीनबागचे आंदोलन दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या महत्वाचा मुद्दा बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी केलेला प्रतिक्रिया दिली आहे.
ओवेसी म्हणाले,’दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकार शाहिन बागेचे रुपांतर जालियनवाला बागेत करू शकते. बळाचा वापर करून सरकार तेथील आंदोलकांना तिथून हटवू शकते. त्यांच्यावर गोळ्याही झाडू शकते, असा गंभीर आरोप एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी केला आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी हा गंभीर आरोप केला.