रायपूर – नक्षलवादाची समस्या अजूनही आहे, मात्र परिस्थिती सुधारत आहे. आम्ही नक्षलवादी समस्येवर चौफेर हल्ला चढवला आहे. आता परिस्थिती अशी आहे की आम्ही नक्षलवाद्यांना त्यांच्या गोटात घेरून मारत आहोत. पूर्वी ते आमच्या कॅम्प आणि पोलिस स्टेशनवर हल्ले करायचे. शिवाय आम्ही आदिवासींना त्यांच्या जमिनी परत दिल्या आहेत, असे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले आहे. छत्तीसगड कॉन्क्लेव्हमध्ये बघेल यांनी राज्यातील त्यांच्या सरकारच्या कारभारावर प्रांजळपणे भाष्य केले.
बघेल म्हणाले की, 18 लाख हेक्टर जमीन आदिवासी गावकऱ्यांना परत करण्याचे कार्य देशात प्रथमच घडले आहे. आज परिस्थिती अशी आहे की वनांचलमध्ये सर्वाधिक बाजरीचे उत्पादन होत आहे. पूर्वीच्या सरकारमध्ये 2 रुपयांना विकली जाणारी महुआ आता 40 रुपयांना विकली जात आहे. त्यासाठी इंग्लंडमधून व्यापारी आले होते, ते 116 रुपये किलो भाव देऊन गेले आहेत.
शिक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, आपल्या सरकारने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी काम केले आहे. हे पहिल्यांदाच घडले आहे की आता सरकार छत्तीसगढी भाषेत एमए करणाऱ्यांनाही नोकऱ्या देत आहे. हिंदी आणि इंग्रजीसह स्थानिक भाषेतील अभ्यासावरही आम्ही भर दिला आहे.
विशेष म्हणजे बघेल सरकारने नक्षलवाद्यांचे मुख्यालय असलेल्या जगरगुंडा येथे एक शाळाही सुरू केली आहे. तब्बल 13 वर्षांनंतर ही घटना घडली असून आता या शाळेत 350 हून अधिक विद्यार्थी शिकतात. राज्य सरकारने प्रत्येक ब्लॉकमध्ये किमान 4 ते 5 शाळा उघडल्या आहेत.