मुळशी प्रादेशिक योजना टप्पा-2 मधून पुरवठा करावा ः जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी
पिरंगुट – मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या भूगाव, बावधन आणि भुकूम या तीन गावांसाठी मुळशी प्रादेशिक योजना टप्पा-2 मधून नळ पाणी पुरवठा योजना करावी अशी मागणी भूगावच्या सरपंच निकिता सणस, बावधनचे सरपंच नीलेश दगडे आणि तीनही गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.
मुंबई येथे मंत्रालयात आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत सरपंच निकीता सणस, भूगव ग्रामस्थ, सदस्य, तसेच जीवन प्राधीकरण कार्यकारी अभियंता पुणे यांच्याबरोबर बैठक झाली, यावेळी ही मागणी करण्यात आली.
यावेळी कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की, सध्या भूगावसाठी पाण्याच्या मंजूर झालेल्या योजनेस श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशय येथील पाणीसाठा पुरेसा नसल्यामुळे ही मंजुरी रद्द करण्याची गरज आहे. मुळशी प्रादेशिक टप्पा-2 योजनेअंतर्गत नवीन नळ पाणी पुरवठा योजना भूगाव, भुकूम आणि बावधन या गावासाठी करणे गरजेचे आहे.
आमदार संग्राम थोपटे यांनी येत्या दिवाळीत या योजनेच्या कामासाठी प्रारंभ करण्यात यावा, अशी विनंती मंत्री गुलाब पाटील यांना केली. यावेळी मंत्री गुलाब पाटील यांनी कार्यकारी अभियंता पुणे याना 2 महिन्यात सर्व्हेक्षण करून योजनेचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा, असे आदेश दिले.
यावेळी ज्येष्ठ नेते राजाभाऊ हगवणे, माजी सरपंच हरिभाऊ चोंधे, माजी उपसरपंच राहुल शेडगे, स्वस्तिक चोंधे, गोंविद मिरघे, मदन माझिरे, विजय माझिरे, बावधनचे माजी सरपंच नीलेश दगडे, गोंविद आंग्रे, कुणाल भरतवंशी, कालिदास शेडगे, रमेश सणस, तुषार माझिरे, मयुर कांबळे, कुमार शेडगे, अर्चना सुर्वे, मदन शेलार, एस. बोराटे आदी उपस्थित होते.