डॉ. शरद निंबाळकर यांचे प्रतिपादन
पिंपरी -“वऱ्हाड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड’ विदर्भात मुबलक पाणी असताना देखील सरकारच्या नाकर्तेपणामुळे पाणी ही विदर्भाची समस्या बनली आहे, असा आरोप पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी केला.
भोसरी येथे विदर्भ सहयोग मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या विदर्भ महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर उषा माई ढोरे, आमदार महेश लांडगे, कवी विठ्ठल वाघ, उद्योजक विनायक भोंगाळे, माजी उपमहापौर शैलेजा मोरे, मंडळाचे अध्यक्ष डॉ दिगंबर इंगोले, कार्याध्यक्ष प्रा.गुलाब देशमुख उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ विजय भटकर, समाजसेवक डॉ रविंद्र कोल्हे, उद्योजक सुरेश वाढोकार, पुरुषोत्तम गोळे, साहित्यिक डॉ प्रतिमा इंगोले, दिग्दर्शक निलेश जळमकर, क्रीडापट्टू विनायक माळी, कृषी तज्ञ प्रभाकर मानकर यांना विदर्भभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, श्याम मानकर, प्रा आशुतोष ठाकरे, डॉ प्रिया गोरखे, प्रज्ञा बोंद्रे, ऋषिकेश खुमकर, डॉ शिल्पा दाणे, भूषण तारक यांना आपुलकी भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी सुवर्णमहोत्सवी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.
महापौर ढोरे यांनी शहराच्या विकासात विदर्भवासियांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. माजी आमदार गजानन दाळू, डॉ कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ इंगोले, सूत्रसंचालन निलेश म्हसाये तर, आभार अरुण इंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारंगधर पल्हाडे, देविदास आढे, दिलीप देशमुख, दिपाली गुल्हाने, कल्पना तिजारे, गणेश कवडे यांनी परिश्रम घेतले.