कराड – प्रत्येक सजग व्यक्तिला आपण आपला उद्योग व्यवसाय संभाळत काहीतरी सामाजिक योगदान द्यावे असे वाटते. माझ्या वाचनात आलेल्या ब्लॅक सोल्जर फ्लाय या विषयावर कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार कराडात कचरा निर्मुलनचा महत्वकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे, अशी माहिती अद्रिशा बायोलॉजीकचे प्रमुख डॉ. चारुदत्त आपटे यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
डॉं. आपटे म्हणाले, ब्लॅक सोल्जर फ्लाय ही माशी आपल्या घरामध्ये आढळणाऱ्या माशीच्या वंशातलीच आहे. घरात आढळणार्या माशीचे पंख पारदर्शक असून त्यांना रंग नसतो. तिचे डोके काळपट तांबडे असतात. तर ब्लॅक सोल्जर फ्लाय माशीचा रंग पुर्णपणे काळा असतो. त्यामुळे तिला ब्लॅक सोल्जर फ्लाय म्हणतात. अजुन एक मोठा फरक म्हणजे घरात आढळणार्या माशीला तोंड असते. तर बीएसएफला लांबसडक चोच असते. ही माशी तिच्या 7 दिवसाच्या आयुष्यात फक्त अर्धा थेंब पाणी पिते.
माणुस जे अन्न खातो त्यातुन त्याची उपयुक्त अशी जीवनद्रव्य बनविण्याची क्षमता खुप कमी असते. मात्र, बीएसएफ माशीची जीवनद्रव्य बनविण्याची क्षमता अफलातुन असते. बीएसएफ माशी साधारण 500 अंडी घालते. ही अंडी 5-6 दिवसांनी फुटुन त्यातुन अळी बाहेर येते. या अळीचे आयुष्य 15 दिवसाचे असते. या अळीचे रुपांतर पुन्हा माशीत होते. हे या माशीचे जीवन चक्र आहे. या अळीचे 15 दिवसात 10-100 मिलीपर्यत वजन वाढते. ब्लॅक सोल्जर फ्लाय ही अळी आपल्या वजनाच्या दीडपट कचरा फस्त करते. सर्व सेंद्रीय पदार्थ उदा. मानवी मलमुत्र व सर्व प्रकारचा ओला कचरा, हे हिचे खाद्य आहे. या अळीची विष्ठा तपकीरी रंगाची असते.
यात भरपुर जीवन द्रव्ये व रोग प्रतिकार शक्ति असते. याला फ्रॉस म्हणतात. हे शेतीला खत म्हणुन वापरले जाते. या अळ्यांची ज्यावेळी पुर्ण वाढ होते, त्यावेळी त्यांच्यात 60- 70 टक्के प्रथिने असतात. यामुळे या अळ्या कोंबडी व माशांचे उत्तम खाद्य म्हणुन वापरल्या जातात. एक टन अळ्यामधुन 200 किलो फ्रॉस मिळते. कचर्याची समस्या संपुर्ण जगाला भेडसावत आहे. कचर्यातुन खत तयार करुन यातुन कचर्याची विल्हेवाट लावण्याचे प्रत्येक ठिकाणी प्रयत्न सुरु आहेत.
मात्र, या प्रकारात घाण वास दुर्घंदी येणे, रोगराई पसरणे व वातावरणाला अतिशय हनीकारक असा ग्रीस हाऊस वायु तयार होणे या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शिवाय, खताची ही प्रक्रिया 3-4 महिन्याच्या कालावधीची असल्याने वेळकाढु आहे. हाच कचरा बीएसएफ अळीला खायला दिल्यास 15 दिवसात 10 हजार आळ्या 1 टन कचरा खातात. यातुन वास नाही, ग्रीन हाऊस वायु नाही व एक टनात उत्तम खाद्य व खत मिळते. सध्या कोंबडी व माशांचे खाद्य खुप महागडे आहे. यावर बीएसएफ अळी हे खाद्य खुपच स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकते. जीवशास्रञात टाकावु ही संकल्पना चुकीची असुन निसर्गातला प्रत्येक जीव जाताना निसर्गासाठी उपयुक्त गोष्टी सोडत असतो. बीएसएफ माशांसाठी मिलनाचा पिंजरा तयार केला जातो.
या पिंजर्यात माशांना पुरेल एव्हडे पाणी ठेवले जाते. या माशा अंडी घातल्यानंतर 7 दिवसांनी मरतात. या मेलेल्या माशा अंड्यातुन बाहेर आलेल्या माशांना खाद्य म्हणुन वापरतात. तर अळ्या कोंबडी व माशांचे खाद्य म्हणुन वापरतात जीवविश्वात कोणतीही गोष्ट टाकावु नाही हेच सत्य आहे. आपल्या देशात कचर्याची समस्या असुन आपल्यात नागरी शिस्तिचा अभाव आहे. मात्र, प्रत्येकाने मनावर घेवुन आपल्या आजुबाजुचा कचरा एकत्र करुन ब्लॅक सोल्जर फ्लायला दिल्यास त्यातुन खत, खाद्य व अर्थकारण आकाराला येवू शकते, असेही डॉ. चारुदत्त आपटे यांनी यावेळी सांगितले.