मुंबई – क्रुझ पार्टीवरील छाप्याच्या प्रकरणातील एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने जो आरोप केला आहे त्याची चौकशी केली जाणार असून एनसीबीच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक उद्या मुंबईत त्यासाठी दाखल होत आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
एनसीबीचे दिल्लीतील डीडीजी दर्जाचे अधिकारी ज्ञानेश्वरसिंह आणि एनसीबीचे दोन वरिष्ठ निरीक्षक असे तीन जणांचे पथक उद्या चौकशीसाठी मुंबईत येत आहे. हा समीर वानखेडे यांना बसलेला एक मोठा धक्का मानला जात आहे.
समीर वानखेडे हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर आहेत. आर्यन खान याला सोडण्यासाठी त्याचे वडील शाहरूख खान यांच्याकडे 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती व त्यातील आठ कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते अशी माहिती आपल्याला मिळाल्याचा दावा एनसीबीचाच साक्षीदार पंच प्रभाकर साईल यांनी केल्याने त्याची गंभीर दखल वरिष्ठ पातळीवरून घेतली गेली आहे.