वालचंदनगर – संचारबंदी असतानाही अनावश्यक बाहेर पडणाऱ्यांची वालचंदनगर कंपनीकडून रस्ते अडविण्यात आले असून प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. वैध कारणाशिवाय दुचाकीवरून फिरणऱ्यांना प्रसंगी फटकेही खावे लागत असल्याचे चित्र वालचंदनगर विविध ठिकाणी पाहावयास मिळत आहेत.
जीवनावश्यक वस्तूंची खरेदी, दवाखाना, कार्यालयात जाणे या व इतर काही कारणांसाठी बाहेर पडणाऱ्यांना संचारबंदीतून सूट देण्यात आली असली, तरी अनावश्यक बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी मेन, पोस्ट कॉलनी, मुख्य बाजारपेठ, दोनशे पाच कॉलनी, प्रमुख रस्ते आणि चौकांवर सुरक्षित विभाग कर्मचारी तैनात आहेत. संचारबंदी असतानाही नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत आहे. बाहेर पडणाऱ्या नागरिकांची वालचंदनगर कंपनीकडून चौकशी करण्यात येत आहे.